Showing posts with label Unseen Passage. Show all posts
Showing posts with label Unseen Passage. Show all posts

Monday, 19 September 2022

Unseen Poem: English: Part 2

 


Vande Matram! In exams we have to solve unseen poem question. Here is one for you.

Read more

Credit: Hitwada Twinkle Star, Poet: Saksham Shrivastava

Poem

A mighty soul

He’s a mighty soul

With a clear goal

He is one of a kind

With a brilliant mind

He has got the power

To ignite young minds

He has got the power to

Turn aspiration into reality

It’s like a staircase

By staying at one place

He is easy to reach

His job is to teach

He is wonderful creature

He is none other that a teacher.

 

Read carefully the poem given above and answer the following.

Q1) Give a title to this poem?

Ans. ___________

Q2) What powers a teacher is having?

Ans. _______________

Q3) Who teaches?

Ans. _____________________

Q4) what qualities of a teacher are mentioned in this poem?

Ans. ______________________

Q5) What is your aspiration? Does your teacher help to turn your aspiration into reality?

Ans. _____________________

 

Note: This poem can be used for essay writing on “My Favourite Teacher”

Share this unseen poem for practice with all students. Comment your answers.

=================

Unseen Poem: English: Part 1

 

Vande Matram! In exams we have to solve unseen poem question. Here is one for you.

Read more

Credit: Hitwada Twinkle Star, Poet: Swara Milind Sohoni

Poem

Happiness can be found in the darkest times.

But one should remember to forget tensity and smile.

Twichiness and worry are all phases of life.

One should work hard and learn from mistakes they've done in life.

Self-rigidity is not the solution, but happiness is.

Think of the moment when time was in your favour.

Savour that moment in your way.

Self confidence is one of the keys to success.

Demotivation is the path to depress.

So, feel the power inside, gain the confidence,

Because happiness can be found in the darkest of times,

But one should forget tensity and smile.

 

Read carefully the poem given above and answer the following question.

Q1) What can be the title of this poem?

Ans. ____________________________

Q2) What is the solution?

Ans. ____________________

Q3) From what one should learn?

Ans. _______________________

Q4) What is the key to success?

Ans. _____________________

Q5) What is path to depress?

Ans. _________________________

Q6) How to gain confidence?

Ans. _______________________

Q7) How to find happiness in darkest of the time?

Ans. ____________________________

Comment your answers and share this unseen poem for practice with all students.

=================


Wednesday, 24 August 2022

खरंच आम्ही वांझ आहोत

अपठीत गद्य

मराठी भाषा विषय असणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी हा ब्लोग आहे.

हा लेख मला सोशल मेडिया वर सापडला. मला अस वाटत कि हा लेख नवयुवकांनी आवर्जून वाचायलाच हवा. हा लेख लिहिणाऱ्या लेखकाचे मी आभार मानते कि त्यांनी असा उत्तम लेख लिहिला. (जर कुणास मुल लेखक माहित असेल तर कृपया नाव comment करा)

सर्वांनी हा लेख लक्षपूर्वक वाचवा या साठीच अपठीत गद्य स्वरुपात हा लेख इथे परत लिहिण्यात आला आहे तरीही वाचकांना विनंती आहे कि त्यांनी हा लेख वाचून खालील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. खास करून विध्यार्थीवृंद!

लेख 
सुधाकरराव म्हणाले, "भारतात आम्ही दोघेच आहोत. वय झालं आहे.  तीच सततचं दु:खणं असतं. दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही. साधी दूधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे. 
तो शेजारचा आसाराम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे. चारपाच मुलं, दोन-तीन मुली, आठ दहा नातवंडं! नुसता गोंधळ असतो. त्याचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, तर कुणी डोक्याला तेल लावतं असतं.
साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात, दवाखान्यात नेतात, सलाईन लावतात. पलंगावर दोघं जण उषा पायथ्याला बसतात. दवाखान्याबाहेर आठ-दहाजण बसून असतात. कुणी शिरा आणतं, कुणी सफरचंद आणतं, कुणी बिस्किटं आणतयं. आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं*.
आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, अलिशान गाडी, पण साधं गेट उघडायला कुणी नाही. 
गाडी चालवायला कुणी नाही. त्या आसारामच्या दारांत मोडक्या तुडक्या का असेना चारपाच बाईक उभ्या असतात. कुणी भाजी आणतयं, कुणी पिण्याचं जार आणतंय, कुणी दळण आणतंय, कुणी  भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जातय, कुणी स्टॅन्डवरच्या पाहुण्याला आणायला जात असतय.
म्हतारी दोनचार नातवाला घेवून किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते. 
रात्री बारा वाजे पर्यंत यांचा आरडा ओरडा, गप्पा, हास्य कल्लोळ चालुच असतो.  दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं.
माझ्या कॅनडाच्या मुलाला ३० लाखांच पॅकेज, ऑस्ट्रेलिया वाल्याला ३५ चं पॅकेज आणि आम्हांला लाख भर पेन्शन.
त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जीवन सोन्यावाणी. माझ्यांकडे कुत्रं नाही. आसारामकडे माणसंच माणसे. आता बोला आम्ही वांझ नाही तर काय आहोत.
परवा मोठ्यां मुलांला हि बोलली एकदा ये महिनाभरासाठी तर तो म्हणाला, "महिनाभरासाठी? मला  एक तासाचा वेळ नाही."
चीडून हि म्हणाली, "मेल्यावर तरी येणार कां नाही?" 
तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला.
सांगा शंकरराव *आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत.
मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यांवर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. नापास मुलंच आई बापांचा खरा आधार आहेत. आसारामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण त्याच्या इतका सुखी कुणी नाही.
परवा आसारामच्या मुलांनं हिला दवाखान्यात नेलं आणलं. आसारामच्या सुनाने स्वयंपांक करुन दिला. काय मिळवलं मी कुणांसाठी?
मुलं म्हणतात आम्हांला तुमचं घर नको शेती नको ! आणि आणि तुम्हीही नकोत."
सुधाकररावांचे डोळे भरून आले. 
सुधाकरराव एकदम कठोर झाले. म्हणाले, "मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच  सहवास मागणार. बाकी काही नको."
जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे.
मुलं आय आय टी झाली आणि आय माय टि ला म्हणजे चहा ला महाग झाली.
मुलं असावीत पण कामाची असावीत. नुसती पाटी लावायला कशाला हवीत.
सहकुंटुंब सहपरिवार तेथे
आनंदाला नाही पारावर.
वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे.
आजच्या तरुण पालकांनी विचार करायला हवा कि त्यांना काय हवं आहे 
मोठे घर पोकळ वासा, हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहीजे.
पैसा हवा की, समाधान शांती.
प्रेम हवयं की, दुरावा.
एकलकोंडे रहायचं की, आनंदी परीवारात.
माणुसकी हवी की, फक्त पैसा.
आणि त्यानुसारच आपल्या मुला-मुलींना संस्कार द्यावेत.  भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करु नका. हे क्षणिक सुख आहे.
इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणसं
माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं 

खालील प्रश्नाची उत्तरे द्या? (ज्या प्रश्नांची उत्तरे comment करण्यास सांगितली आहेती ती नक्की comment करावीत)

प्रश्न १) वृद्ध माता आणि पिता ज्यांची मुले त्यांच्यापासून दूर राहतात त्यांना काय काय समस्यांचा सामना करावा लागतो?

उत्तर: _________________________

प्रश्न २) आसाराम का सुखी आहे?

उत्तर: ____________________________

प्रश्न ३) सुधाकाररावाना असे का वाटते कि ते वांझ आहेत?

उत्तर: ____________________________

प्रश्न ४) शाळेत नापास मुलं आई वडिलांचा आधार का होतात? लेख वाचून योग्य उत्तर द्यावे?

उत्तर: _____________________________

प्रश्न ५) तरुण पालक ज्यांना आता लहान मुल-बाळ आहे त्यांनी आपल्या मुला-बाळास कुठल्या गोष्टींचा विचार करून संस्कार द्यावेत?

उत्तर: ____________________________

प्रश्न ६) सुधाकारारावांच्या मदतीला जसे आसाराम चे सुना-मुलं आली तशी तुमच्या आई-वडिलांची मदत करण्यासाठी कोण आहे?

उत्तर: _______________________________ (comment करून सांगा.)

लेख इथपर्यंत वाचला त्यासाठी धन्यवाद! हा ब्लोग खर तर पालकत्व कसं करावं यासाठी आहे. हा ब्लोग सर्व सुजाण मित्र मंडळींसोबत शेयर करा आणि comment करा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे.
वंदे मातरम!

=============================

Please check these links:

My Blogs:

1) Cultivate Study

2) Law Notes Dynamo

3) Tenacious Reading

Facebook Page:

रोहिणी ब्लॉग्स और वीडियो कलेक्शन

YouTube Channels:

1) Rinki’s Creative Channel

2) One Liners

Telegram channel

Blogs and Videos by Rinki_Rohini

======================

 

 

धर्मग्रंथ

अपठित गद्य 

हिंदी भाषा विषय के छात्रों के साथ यह लेख अवश्य शेयर करे| यह लेख मुझे सोशल मिडिया से मिला हैं| इस लेख को हर उस युवक ने ध्यानपूर्वक पढना चाहिए जो प्राचीन संस्कृति की धरोहर को संभालना चाहता हैं | युवा पीढ़ी इसे ध्यान से पढ़े इसके लिए ही इसे अपठित गद्य के रूप में यहाँ लिखा गया हैं| जिस लेखक ने इसे लिखा हैं मुझे उनका नाम तो नहीं पता पर हा मैं उनका धन्यवाद देती हु की उन्होंने ये लेख लिखा हैं| तो यह लेख ध्यान पूर्वक पढ़े और निचे दिए प्रश्नों के उत्तर दे|

लेख 

जब हम हमारे धर्मग्रंथों को पढ़ते हैं तो हम पाते हैं कि हमारे सारे धर्मग्रंथ राक्षसों के वध से भरे पड़े हैंराक्षस भी ऐसे ऐसे वरदानों से सुरक्थेषित थे कि दिमाग घूम जाएकिसी को वरदान प्राप्त था कि वो न दिन में मरेगा-न रात में, न आदमी से मरेगा-न जानवर से, न घर में मरेगा-न बाहर, न आकाश में मरेगा- न धरती परउसी तरह, दूसरे को वरदान था कि वे भगवान भोलेनाथ और विष्णु के संयोग से उत्पन्न पुत्र से ही मरेगातो, किसी को वरदान था कि, उसके खून की जितनी बूंदे जमीन पर गिरेगी, उसकी उतनी प्रतिलिपि पैदा हो जाएगीतो, कोई अपने नाभि में अमृत कलश छुपाए बैठा था

लेकिन, हर राक्षस का वध हुआहालाँकि, सभी राक्षसों का वध अलग अलग देवताओं ने अलग अलग कालखंड एवं अलग अलग प्रदेशों में कियालेकिन, सभी वध में एक चीज समान थी किसी भी राक्षस का वध उसका स्पेशल स्टेटस हटाकर अर्थात उसके वरदान को कैंसिल कर के नहीं किया गयाकि, तुम इतना उत्पात मचा रहे हो इसीलिए, हम तुम्हारा वरदान कैंसिल कर रहे हैंऔर, फिर उसका वध कर दियाबल्कि, हुआ ये कि, देवताओं को उन राक्षसों को निपटाने के लिए उसी वरदान में से रास्ता निकालना पड़ा कि इस वरदान के मौजूद रहते हम इसे कैसे निपटा सकते हैं|

और, अंततः कोशिश करने पर वो रास्ता निकला भीएवं, सब राक्षस निपटाए भी गएकहने का मतलब है कि, परिस्थिति कभी भी अनुकूल होती नहीं है बल्कि उसे पुरुषार्थ से अनुकूल बनाई जाती हैआप किसी भी एक राक्षस के बारे में सिर्फ कल्पना कर के देखें कि अगर उसके संदर्भ में अनुकूल परिस्थिति का इंतजार किया जाता तो क्या वो अनुकूल परिस्थिति कभी आती

उदाहरण के लिए सर्वचर्चित रावण को ही ले लेते हैंरावण के बारे में भी ये एक्सक्यूज दिया जा सकता था कि, रावण को कैसे मारेंगे भलाउसे तो पचासों तीर मारे और उसके सर को काट भी दिएलेकिन, उसका सर फिर जुड़ जाता है तो इसमें हम क्या करें इसके बाद अपने इस अपयश का सारा ठीकरा रावण को ऐसा वरदान देने वाले ब्रह्मा पर फोड़ दिया जाता कि| उन्होंने ही रावण को ऐसा वरदान दे रखा है कि अब उसे मारना असंभव हो चुका हैऔर फिर| ब्रह्मा पर ये आरोप डाल कर चल दिया कि जब ब्रह्मा खुद रावण को ऐसा अमरत्व के सरीखा वरदान देकर धरती पर राक्षसों का राज लाने में लगे हैं तो भला हम क्या कर सकते हैं

लेकिन, ऐसा नहीं हुआबल्कि, भगवान राम ने उन वरदानों के मौजूद रहते ही रावण का वध कियाक्योंकि, यही "सिस्टम" हैक्योंकि, हमारे पौराणिक धर्मग्रंथों में ऐसे एक भी साक्ष्य नहीं मिलते हैं कि किसी राक्षस के स्पेशल स्टेटस (वरदान) को हटा कर पहले परिस्थिति अनुकूल की गई हो तदुपरांत उसका वध किया गया हो

परंतु, हर युग में एक चीज अवश्य हुआ हैऔर, वो है राक्षसों का विनाशएवं, सनातन धर्म की पुनर्स्थापनालेकिन, घूम फिर कर बात वहीं आकर खड़ी हो जाती है कि, भले त्रेतायुग के भगवान राम हों अथवा द्वापर के श्रीकृष्ण, राक्षसों के विनाश के लिए हर किसी को जनसहयोग की आवश्यकता पड़ी थी| हर युग में राक्षसों के विनाश में जनसहयोग की आवश्यकता सिर्फ राक्षसों के विनाश के लिए ही नहीं पड़ती है| बल्कि, इसीलिए भी पड़ती है ताकि, राक्षसों के विनाश के बाद जो एक नई दुनिया बनेगी, उस नई दुनिया को उनके बाद के लोग संभाल सके|  इसीलिए निषादराज, वानर राज सुग्रीव, वीर हनुमान, जामवंत आदि को गले लगाया गया है| और, माता शबरी को उचित सम्मान दिया गया है| वरना, सोचने वाली बात है कि जो रावण, पंचवटी में लक्ष्मण के तीर से खींची हुई एक रेखा तक को पार नहीं कर पाया था, भला उसे पंचवटी से ही एक तीर मारकर निपटा देना क्या मुश्किल था?

अथवा, जिस महाभारत को श्रीकृष्ण सुदर्शन चक्र के प्रयोग से महज 5 मिनट में निपटा सकते थे भला उसके लिए 18 दिन तक युद्ध लड़ने की क्या जरूरत थी| लेकिन, रणनीति में हर चीज का एक महत्व होता है, जिसके काफी दूरगामी परिणाम होते हैं|

धर्मग्रंथ रोज सुबह नहा धो कर सिर्फ पुण्य कमाने के उद्देश्य से पढ़ने के लिए नहीं होती है| बल्कि, हमारे धर्मग्रंथों के रूप में हमारे पूर्वज/देवताओं ने अपने अनुभव हमें ये बताने के लिए लिपिबद्ध किया है ताकि उनके आगामी वंशज ये जान सकें अगर भविष्य में फिर कभी ऐसी स्थिति उत्पन्न होगी तो उससे कैसे निपटा जाएगा|

निम्नलिखित प्रश्नों के उत्तर दे|

प्रश्न १) भारत के धर्मग्रंथों के अनुसार राक्षसों को किस तरह के वरदान मिला करते थे?

उत्तर: __________________________________________________________

प्रश्न २) देवताओ ने जितने भी राक्षसों का वध किया उन सब में क्या समान बात थी?

उत्तर: __________________________________________________________

प्रश्न ३) रावण को कैसा वरदान मिला था?

उत्तर: _________________________________

प्रश्न ४) रावण को जो वरदान ब्रम्हा ने दिया क्या उसके लिए ब्रम्हा को दोषी ठहराना उचित हैं? विस्तार में समझाये|

उत्तर: _____________________________________________________

प्रश्न ५) हर युग में क्या हुआ?

उत्तर: ___________________________________

प्रश्न ६) राक्षसों के विनाश में जनसहयोग की क्यों आवश्यकता होती हैं?

उत्तर: _______________________________________

प्रश्न ७) धर्मग्रंथ लिपिबध्द करने का उद्देश क्या हैं?

उत्तर: __________________________________________

सभी प्रश्नों के उत्तर ध्यानपूर्वक वो लेख पढने के बाद दे| इस लेख में दी गयी घटनाओं का और अभी की सामाजिक और राजकीय परिस्थिति का क्या मेल हैं? इस प्रश्न का उत्तर कमेंट करिए और ये ब्लॉग सभी युवकों के साथ शेयर करिए.

वन्दे मातरम!

नामस्मरण

मराठी भाषा विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपठीत गद्य या शीर्षकाखाली वरील कविता दिली आहे. हि कविता मला सोशल मिडिया वर सापडली आहे. कवी कवियत्री कोण आहे माहित नाही . कृपया माहित असल्यास त्यांचे नाव comment करा. 
खर तर कविता गुरु समर्पणाची आहे पण युवा पिढी ने अश्या कविता लक्षपूर्वक वाचायलाच हव्यात या साठी खालील प्रश्न उत्तरे या कविते सोबत दिलेली आहेत.


रोज नामस्मरण
केल्यावाचून राहू नकोस
गुरु  पाहताहेत  तुला
नामस्मरण मात्र विसरु नकोस...

तुझ्या वाटेत आडवे खूप येतील...
पायात पाय घालून पाडतील....
त्यांना घाबरून तुझं
उभं राहणं सोडू नकोस..
गुरु  पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस....

तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही....
कौतुकासाठी तुझं नांव
सूचेलच असं नाही....
तू मात्र इतरांचं कौतुक
करण्यास  कचरु नकोस.. 
गुरु पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस....

तुलासुद्धा मन आहे
हे माहीत आहे मला.....
पण परमेश्वर हृदयात असताना काय रे कमी तुला....
इतरांना भरभरून देणं मात्र
कधी सोडू नकोस ...   
गुरु  पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस....

रडावंसं वाटतं तेव्हां
रडून तू मोकळा हो...
कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हां,
लढून तू मोकळा हो....
रडण्यामध्ये मात्र तुझे
कार्य विसरू नकोस      
गुरु पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस....

तुझ्या कार्याचे कोणाला 
पुरावे द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला कार्य 
सोडायची गरज नाही...
गुरु संकल्पासाठी पुढे
चालणं तू सोडू नकोस.......
गुरु पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस...
श्री स्वामी समर्थ

==================
अपठीत गद्य

वरील कविता लक्ष पूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
प्रश्न १) नामस्मरण का करायला हवे?
उत्तर: _________________________
प्रश्न २) जीवनात कुठल्या अडचणी येतात? कवितेतून वाचून विस्तार पूर्वक लिहा.
उत्तर: ___________________
प्रश्न ३) या कवितेत गुरूचा प्रत्येक अडचणीमध्ये काय उपदेश आहे?
उत्त्तर: ____________________
प्रश्न ४) परमेश्वर ज्याच्या हृदयी असतो त्यांचे जीवन कशे असते?
उत्तर: ____________________
प्रश्न ५) रडावस वाटलं तर काय करायला हव?
उत्तर: ______________________
प्रश्न ६) या कवितेनुसार मनुष्याने काय-काय करायच नाही आहे?
उत्तर: _____________________
प्रश्न ७) या कवितेनुसार मनुष्याने आपल्या जीवनात काय काय करायला हव?
उत्तर: _________________________
प्रश्न ८) कवी या कवितेत म्हणतात "गुरु तुला पाहत आहे" याचा अर्थ काय?
उत्तर: _________________________

इथपर्यंत वाचलं त्यासाठी धन्यवाद. हा ब्लोग युवा पिढीसोबत शेयर करा.

=============================

Please check these links:

My Blogs:

1) Cultivate Study

2) Law Notes Dynamo

3) Tenacious Reading

Facebook Page:

रोहिणी ब्लॉग्स और वीडियो कलेक्शन

YouTube Channels:

1) Rinki’s Creative Channel

2) One Liners

Telegram channel

Blogs and Videos by Rinki_Rohini

======================

 


मैत्रीण

अपठीत पद्य 
मराठी भाषा विषय ज्यांचा आहे त्यांच्यासाठी अपठीत पद्य 
साभार - सोशल मेडिया 

कविता लक्ष देवून वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

फक्त एक छान मैत्रीण हवी 

देवाला मी आज निवांत पाहीलं आणि लगेच एक फूल वाहिलं  
देवाने हसून म्हटलं "मागा, काय जे मनात साठलं."
"देवा मला नको काही, कोऱ्या कागदावर सही घे "
"एक मिनिट, एक मिनिट ... विचारलेच आहेस म्हणून मागतेय.
एक छानशी मैत्रीण दे. हवे तर अजुन एखादे फुल घे.
दिसायला छान नसली तरी चालेल.
पण बोलायला छान असायला हवी.
डोळे सुंदर नसले तरी चालेल,
पण नजरेतून बोलणारी हवी,
केस लांब नसले तरी चालेल,
पण सोबत लांब चालणारी हवी
माझ्या प्रत्येक दुःखात रडली नाही तरी चालेल,
फक्त माझ्या सुखात थोडे हसणारी हवी.
यातलेही काही कमी असेल तरी चालेल,
फक्त एक छान मैत्रीण हवी.


खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
प्रश्न १) कवयत्रीने  देवाची पूजा कशी केली?
उत्तर _________________________

प्रश्न २) देव प्रसन्न झाल्यावर कवयत्रीने काय माघितले ?
उत्तर _________________________

प्रश्न ३) कवयत्रीस आपल्या मैत्रीणीमध्ये कुठले गुण हवे आहेत?
उत्तर _________________________

प्रश्न ४) तुमच्या चांगल्या मित्र किंवा मैत्रिणीचे सद्गुण सांगा ? 
उत्तर _____________________________
नोट: या प्रश्नाचं उत्तर हि पोस्ट शेयर करून कॅप्शन मध्ये लिहा आणि तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीस tag करा.

प्रश्न ५) छान मित्र किंवा मैत्रीण याची तुमची कल्पना कशी आहे?
उत्तर ________________________
नोट: या प्रश्नाच उत्तर comment करा.

नोट: हि कविता मित्र किंवा मैत्रिणीशी संबंधित निबंधात तुम्ही लिहू शकता.

इथपर्यंत वाचल्या बद्दल धन्यवाद!

=============================

Please check these links:

My Blogs:

1) Cultivate Study

2) Law Notes Dynamo

3) Tenacious Reading

Facebook Page:

रोहिणी ब्लॉग्स और वीडियो कलेक्शन

YouTube Channels:

1) Rinki’s Creative Channel

2) One Liners

Telegram channel

Blogs and Videos by Rinki_Rohini

======================

 


Tuesday, 2 August 2022

गिरधारी पुत्र विक्रम

वंदे मातरम वाचक मंडळी!
खालील लेख मला सोशल मेडिया तून सापडला आहे. अपठीत गद्य साठी उत्तम अशी कथा या मध्ये आहे. विशेष करून नववी आणि दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम लेख आहे. कृपया लक्षपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे comment करा. अन्य मित्रांसोबत हा लेख शेयर करा.

ही घटना कारगिल युद्धानंतर जवळपास एक वर्षानंतर ची आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आले. पत्र लिहिणाऱ्याने स्वत: चा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून  करून दिला होता.

पत्रात ते लिहीतात, त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीर मरण आले होते, आणि त्याचा पहिला स्मृतिदिन दी. ०७/०७/२००० रोजी येत आहे आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्याला जेथे वीरमरण आले ती जागा त्यांना व  त्याच्या पत्नीला बघायची इच्छा आहे. जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता. 

हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही, परंतु या वीरमाता- वीरपित्याच्या भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व भेटीचा खर्च या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला.

या शूरवीराच्या हुतात्मा दिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीरमाता- वीरपित्याला त्यांच्या एकुलता एक पुत्राला जेथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले. तेथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थ कडक सलामी दिली.
       
तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खुप फुलं होती. त्याने शिक्षकांच्या पायांवर डोके ठेवले आणि फुलं वाहिली. त्याने आपले डोळे पुसले आणि नंतर तो इतरांसारखाच सावधान उभा राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला.
       
शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले, “तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात. तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली? तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असता आणि मी त्या सॅल्युट ला प्रतिसाद दिला असता! ”
        
"नाही सर. येथे मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणजे येथे प्रत्येकजण ड्यूटीवर सज्ज आहे आणि मागील एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत.”
       
“मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमधील त्याच डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता. आणि फक्त हेच नाही..... ” तो काही क्षण बोलायचं थांबला.

शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले, “मला सांगा, जे काही मनात असेल ते  कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा. मी रडणार नाही.”
      
“मला माहित आहे तुम्ही रडणार नाही सर, पण मी ही रडायला नको ना!” तो सैनिक पुढे म्हणाला, “त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीन गन ने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते. आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटांच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसा घेत कसेबसे उभे राहिलो. पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती. त्यांना बहुधा आमचे हाता- पायांचा किंवा पाठीवरील सामानाचा थोडाफार भाग दिसत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते. अजून ब्रिगेड च्या इतर सैनिकांची कुमक येण्यात विलंब होत होता. काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते. मग...” त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला.

"पुढे काय झालं?" शिक्षकाने विचारणा केली.

सैनिक पुढे म्हणाला, "मी म्हणालो, 'त्यांचा गोळीबार चालूच राहिल, वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. मी हे उरलेले तीस फुट अंतर जिवावर उदार होऊन जातो, म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्याच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या खंदक (बंकर) कडे पळत जातो आणि हातबाॅम्ब (ग्रेनेड) टाकून तो उध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या.'

"मी हातात हातबाॅम्ब (ग्रेनेड) घेऊन शत्रू च्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहीले व म्हणाला ‘तू वेडा आहेस का? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत. आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण (कव्हरिंग) दे,' आणि उत्तराची वाट न पाहता, जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकर च्या दिशेने पळत सुटला."
       
“पाकिस्तानी हेवी मशीन गन (H.M.G.) च्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीन गन मधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”
      
“सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. मी त्यांचे डोके हातात धरले त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला."
       
"मी आपल्या वरिष्ठांना तुमच्या गावी त्याचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी देण्याची विनंती केली, परंतु मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगीरीवर मला पाठविण्यात आले."
      
“कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतीम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहीली असती. ते मी करू शकलो नाही. पण मला ही फूलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली" आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला.
       
शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मुक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभिर्याने पाहिले आणि सैनिकाने ही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले.
       
शिक्षकाने आपल्या खांद्यावरील पिशवीतून एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, “माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सदरा विकत घेतला होता. पण तो आला नाही. आणि आली, त्याच्या वीर मृत्यूची बातमी!"

“आता तो सदरा कोण घालेल? जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तेथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा या ठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती, परंतु आता मला माहित आहे की हा सदरा कुणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या."

त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा स्वीकारला.

वीरगती मिळालेल्या कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते जय हिंद।

कारगिल हिरोचे नाव: कॅप्टन विक्रम बत्रा.
हिरोच्या वडिलांचे नाव: गिरधारी लाल बत्रा.
हिरोच्या आईचे नाव: कमल कांता.

माझ्या प्रिय वाचक मित्रांनो आणि मैत्रिनिनो, कॅप्टन विक्रम बत्रा सारखे लोक आमचे वास्तविक नायक आहेत. त्यांच्या बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवू या.

जय हिंद!

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात द्या.

१) वरील लेखात सांगितलेली घटना कुठल्या कधीची आहे?

उत्तर: ______________________________________

२) पत्र कोणी कोणास लिहिले?

उत्तर: ______________________________________

३) वीरमाता-पिता याच्या कारगिल भेटीचा खर्च कोणी दिला?

उत्तर: ______________________________________

४) या लेखात कुठल्या युद्धाचा उल्लेख करण्यात आला आहे?

उत्तर: ______________________________________

५) शिक्षकाच्या पायावर कुणी डोके ठेवले?

उत्तर: ______________________________________

६) पाकिस्तानी सैनिक काय करत होते?

उत्तर: ______________________________________

७) किती भारतीय सैनिक पाकिस्तानी बंकारच्या जवळ पोहोचले होते?

उत्तर: ______________________________________

८) विरगातीस प्राप्त भारतीय सैनिकाने किती पाकिस्तानी सैनिक यमसदनास पाठविले?

उत्तर: ______________________________________

९) वीरगतीस प्राप्त भारतीय सैनिकाच्या शरीरात किती गोळ्या लागल्या होत्या?

उत्तर: ______________________________________

१०) शिक्षकाने आपल्या मुलासाठी काय विकत घेतले होते?

उत्तर: ______________________________________

११) विरगातीस प्राप्त भारतीय सैनिकाचे शेवटचे शब्द काय होते?

उत्तर: ______________________________________ comment करा.

१२) कारगिल युद्धात अत्यंत धाडसाने तेरा पाकिस्तानी सैनिकांना मारणाऱ्या त्या शूर भारतीय सैनिकाचे नाव काय होते?

उत्तर: ______________________________________

१३) बेचाळीस गोळ्या शरीरात लागलेल्या असताना देखील पाकिस्तानी बंकर जिंकणाऱ्या सैनिकाच्या आई आणि वडिलांचे नाव काय होते?

उत्तर: ______________________________________

 

खालील प्रश्नांची ३ ते ४ वाक्यात उत्तरे द्या.

१) पत्रात काय लिहिले होते आणि कोणती विनंती केली होती?

उत्तर:________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

२) संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने स्वत: च्या पगारातून वीरमाता-पिता याच्या कारगिल भेटीचा खर्च का दिला होता? आणि यावरून तो अधिकारी कसा आहे?

उत्तर:________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

३) पाकिस्तानी बंकर नष्ट करण्यासाठी भारतीय सैनिकाने कुठली योजना केली होती?

उत्तर:________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

४) विरगतीस प्राप्त भारतीय सैनिकाने पाकिस्तानी बंकर कशे भारतीय ताब्यात घेतले?

उत्तर:________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

५) हि कथा वाचल्यावर एक नायक (हिरो) कसा असतो असे आपणास वाटते?

उत्तर:________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________ comment करा

६) या कथेवरून काय बोध घेतला?

उत्तर:________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________ comment करा


सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वर दिलेली कथा लक्ष देवून वाचा.  

ही कथा जेवढी प्रेरणादायक आहे तेवढीच देशसेवेचे धडे देणारी आहे. कृपया हि कथा आपल्या कुटुंबातील मुलांसोबत वाचा आणि कमेंट मध्ये जय हिंद लिहा.

वंदे मातरम्!


Sunday, 31 July 2022

भारतात ब्राह्मण असणे चांगले की वाईट...? लेखक : अवधूत मोहिते

नमस्कार वाचक मंडळी. खालील लेख मी लिहिला नाही बस मला सोशल मेडिया वर सापडला आहे. अपठीत गद्य या सरावासाठी मी इथे आपणा सर्वा सोबत शेयर करत आहे. लक्ष देवून वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
=============
मी ब्राह्मण नाही, मी मराठा आहे पण मला वाटते की मी माझ्या गेल्या काही वर्षांच्या निरीक्षणावर आधारित उत्तर देऊ शकतो. आजच्या भारतात ब्राह्मण असणे म्हणजे १९३० च्या जर्मनीतील ज्यू होण्यासारखे आहे. ज्यू हे जर्मनीच्या लोकसंख्येच्या अगदी लहान टक्के होते आणि जर्मन समाजाच्या सर्व समस्यांसाठी त्यांना दोषी ठरवले गेले. आज भारतात तेच घडत आहे. सर्व समस्यांसाठी ब्राह्मणांना बळीचा बकरा बनवले जात आहे, लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अल्प टक्के असूनही.
 ब्राह्मणही श्रीमंत किंवा शक्तिशाली नसतात. त्यातले बहुतेक सर्वांसारखे मध्यमवर्गीय आहेत आणि बरेचसे गरीब पुजारी आहेत जे लग्नासारख्या धार्मिक विधी करून उदरनिर्वाह करतात. ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण नाही किंवा त्यांना सरकारकडून कोणतेही विशेष अनुदान दिले जात नाही. तरीही त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी दोष दिला जातो. कम्युनिस्ट, इस्लामिक कट्टरपंथी आणि सर्व हिंदू विरोधी गट सतत ब्राह्मणांचा तिरस्कार करत आहेत.
त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी बळीचा बकरा बनवले जात आहे जसे ज्यू जर्मनीत बनवले गेले होते.
केरळमधील ब्राह्मण आदि शंकराचार्य यांनी आपल्या तीव्र इच्छाशक्तीने, बुद्धिमत्तेने आणि वादविवाद शक्तीने वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले.
वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता या ज्ञानाचे जतन आणि जतन करणारे ब्राह्मणच होते ज्यांनी इस्लामिक आक्रमक आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या १००० वर्षांच्या गुलामगिरीतून.
ब्राह्मणांनीच संस्कृत भाषा जिवंत ठेवली (आणि अजूनही ठेवली आहे). 
ज्या व्यक्तीने मराठा साम्राज्याचा प्रसार केला आणि मुघल साम्राज्याचा नाश केला तो ब्राह्मण बाजीराव पेशवा होता.
ब्राह्मण हे आपल्याला प्राचीन वैदिक संस्कृतीशी जोडणारे दुवे आहेत. ब्राह्मण नसते तर पर्शियन, ग्रीक, इजिप्शियन, रोमन आणि इतर अनेक मृत संस्कृतींप्रमाणे वैदिक संस्कृती नष्ट झाली असती. आपला धर्म वाचवण्यासाठी सर्व जातीचे हिंदू लढले, पण वैदिक धर्माचे मूळ ग्रंथ आणि परंपरा वाचवणारे ब्राह्मण होते.
इंग्रजीत एक म्हण आहे : 
“To kill a snake, cut it's head off”.
तसेच हिंदू धर्माला मारण्यासाठी सर्व ब्राह्मणांचा नाश करा. भारतातील हिंदुविरोधी शक्तींना हे माहित आहे आणि म्हणूनच ते ४० च्या दशकात नाझींसारखे ब्राह्मण ज्यूंच्या मागे लागले आहेत.
ब्राह्मणांनी भूतकाळात खालच्या जातींना वाईट वागणूक दिली हे बरेच लोक पुढे आणत आहेत. ते खरे आहे आणि मी जाती भेदाला विरोध करतो. परंतु सर्व हिंदू, बौद्ध, जैन यांना इस्लामी राज्यकर्त्यांनी वाईट वागणूक दिली आहे याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. इस्लामी आक्रमकांप्रमाणे ब्राह्मणांनी कधीही कोणाच्या विरुद्ध नरसंहार मोहिमेचे नेतृत्व केले नाही.
२५०० वर्षांपूर्वीच्या वैदिक काळात ब्राह्मण फक्त शक्तिशाली होते. ५०० बी.सी. मध्ये बौद्ध धर्माच्या जन्मानंतर, भारतीयांनी ब्राह्मणांचा अधिकार नाकारला आणि हळूहळू बौद्ध धर्म स्वीकारला. ८ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म हा बहुसंख्य धर्म होता जेव्हा शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर केवळ २००वर्षांनी इस्लामिक आक्रमणे सुरू झाली आणि भारत इस्लामिक राज्यकर्त्यांची वसाहत बनला. मुघल साम्राज्याच्या समाप्तीनंतर, ब्रिटिश वसाहतवाद्यांनी त्वरीत सर्व सत्ता ताब्यात घेतली.
भारतात गेली १००० वर्षे ब्राह्मण सत्तेवर नव्हते. सर्व राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय सत्ता इस्लामी सम्राटांच्या आणि नंतर इंग्रजांच्या हातात एकवटली. आजच्या भारतातील बहुतांश दारिद्र्य आणि विषमता ही वसाहतवाद आणि भांडवल शाहीचा परिणाम आहे.
परकीय आक्रमक आणि वसाहतवाद्यांनी निर्माण केलेल्या परिस्थितीसाठी ब्राह्मणांना का दोषी धरले जाते?
सध्याच्या पिढीतील ब्राह्मणांना इतरांना ब्राह्मणांबद्दल काय वाटते याची कमीत कमी चिंता आहे कारण त्यांना स्वतःचा व्यवसाय आहे. ते भारताशिवाय जगभर यशस्वी झाले आहेत.
त्यांनी मॅसॅच्युसेट्समध्ये एक कोनाडा देखील मिळवला आहे.  "बोस्टनचे ब्राह्मण" हे वरच्या उच्चभ्रूंना संबोधित करण्यासाठी एक लोकप्रिय म्हण आहे. ते खूप यशस्वी उद्योजक आहेत. ते असंख्य पॅरास्टेटल्स आणि असंख्य MNCs मध्ये प्रमुख पदांवर आहेत. नवीन जनरल ब्राह्मण जगाच्या विविध कानाकोपऱ्यात स्थलांतर करतात आणि त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान तयार करतात. ब्राह्मण शांततेत राहतात आणि हिंसा टाळतात.
तेव्हा कृपया षडयंत्र समजून घ्या. हे की, हिंदू धर्म संपवायचा असेल तर तुम्हाला फक्त ब्राह्मणांना संपवायचे आहे किंवा तटस्थ करायचे आहे.

खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

१) लेखक कोणत्या जातीचा आहे आणि तो कुठल्या समुदायाबद्दल बोलत आहे?

उत्तर: _______________________________________________________

२) आजच्या ब्राम्हण समाजात आणि १९३० सालच्या जर्मनीच्या ज्यू समाजात काय साम्य आहे?

उत्तर: _______________________________________________________

३) ब्राम्हण समुदायाची स्थिती आजच्या काळात कशी आहे?

उत्तर: _______________________________________________________

४) ब्राम्हण समाजाचा तिरस्कार कोण करत आहे?

उत्तर: _______________________________________________________

५) वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन कोणी केले? आणि त्यसाठी त्यांनी काय केले?

उत्तर: _______________________________________________________

६) भारत १००० वर्ष गुलामगिरीत होता या काळात ब्राम्हण समाजाने काय काय केले?

उत्तर: _______________________________________________________

७) मुघल साम्राज्याचा नाश कुठल्या ब्राम्हणाने केला?

उत्तर: _______________________________________________________

८) ब्राम्हण समुदायाने भारतीय संस्कृतीचे रक्षण कसे केले?

उत्तर: _______________________________________________________

९) हिंदू धर्माचा नाश करण्या साठी हिंदू विरोधी शक्ती काय करत आहेत आणि का?

उत्तर: _______________________________________________________

१०) लेखकाने कुठल्या गोष्टीचा विरोध केला आहे? आजच्या काळात या गोष्टीचा विरोध करणे का गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते?

उत्तर: _______________________________________________________

११) इस्लामी राज्यकर्त्यांनी काय केले? इस्लामी राज्यकर्त्यांनी जे केले त्याकडे दुर्लक्ष करणे किती योग्य आहे?

उत्तर: _______________________________________________________

१२) बौद्ध धर्माचा ब्राम्हण समुदायावर काय परिणाम झाला?

उत्तर: _______________________________________________________

१३) आजच्या काळात ब्राम्हण काय काय उद्योग करत आहेत?

उत्तर: _______________________________________________________

१४) या लेखामध्ये कुठल्या षडयंत्रा बद्दल लेखकाने सांगितले आहे?

उत्तर: _______________________________________________________

१५) हिंदू समाजाबद्दल हा लेख वाचल्यावर आपले काय मत आहे?

उत्तर: _______________________________________________________

या सर्व प्रश्नांची योग्य उत्तर कृपया comment करा. हा लेख सर्व विध्यार्थांसोबत शेयर करा. लेखकाचे धन्यवाद ज्यांनी असा उत्तम लेख लिहिला आहे.

=============================

Please check these links:

My Blogs:

1) Cultivate Study

2) Law Notes Dynamo

3) Tenacious Reading

Facebook Page:

रोहिणी ब्लॉग्स और वीडियो कलेक्शन

YouTube Channels:

1) Rinki’s Creative Channel

2) One Liners

Telegram channel

Blogs and Videos by Rinki_Rohini

======================

बाली

  बाली को ब्रम्हा जी से ये वरदान प्राप्त हुआ   की, 'जो भी उससे युद्ध करने उसके सामने आएगा ,  उसकी आधी ताक़त बाली के शरीर मे चली जायेगी , ...